एकूण पृष्ठदृश्ये

नमस्कार आपलं या वेबसाईटवर स्वागत आहे

१९ जानेवारी २०२६

अंतर्मुख करणारी कविता: मनातल्या मनात वाचायच्या कविता

अंतर्मुख करणारी कविता: मनातल्या मनात वाचायच्या कविता 

मनातल्या मनात वाचायच्या कविता हे शीर्षक वाचून कोणत्याही वाचकाला वाटू शकते की या कविता मनातल्या मनात वाचायच्या कविता आहेत म्हणजे त्या नेमक्या कशा कविता, कोणत्या विषयावरील कविता असतील त्यात नेमके काय असेल त्यामुळे या कविता मनातल्या मनात वाचायच्या आहेत
      जीवन जगणारा प्रत्येक जण हा कवीच असतो फरक एवढाच कोणी लेखणीच्या माध्यमातून कविता लिहून व्यक्त होतो तर कोणी न लिहिता एखादी कविता जगत असतो कवी विवेक ओवर मोगले आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा मुक्त आविष्कार स्वतःशीच कवितेच्या रूपात मनातल्या मनात पडताळून पाहतात. 
   त्यांच्या ह्या मनातल्या मनात पडताळून पाहण्यालाच ती मनातल्या मनात वाचायच्या कविता म्हणतात त्याबद्दल ते म्हणतात. 
"भावनांचा हा मुक्त आविष्कार 
 पडताळत राहणं स्वतःशीच 
यालाच मी म्हणतो 
मनातल्या मनात वाचायच्या कविता"( पृ.५)
त्यांच्या म्हणण्यामुळे या कवितासंग्रहाच्या शीर्षकाबद्दल असणारा बाशकाच्या मनातील संभ्रम नाहीसा होतो. 
कवी कविता लिहितो म्हणजे तो त्याच्या भोवतालच्या चांगल्या वाईट घटना घडामोडींबद्दल त्याला काय वाटते ते आपल्या कवितेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे मांडत असतो एवढंच नाही तर त्याच्या लेखनामागे काहीतरी भूमिका असते कविता कोणीतरी प्रेरणास्त्रोत असतो तो त्याला लिहिण्यासाठी प्रेरित करत असतो.
           आपल्याला वरवर कवी शांत निवांत दिसत असतो पण साहित्यिक कधीही कुठल्याही गोष्टीवर समाधानी राहत नाहीत त्यांना समाजात कुठे काय होणे दिसते तेथे कवी पाहण्याचे त्यावर बोलण्याचे काम कधी करत असतो कवींना मी नेहमी ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने म्हणजेच सत्याच्या बाजूने तो असतो त्याबद्दल ते म्हणतात. 
 "वरवर मी दिसत असलो शांत तरी 
धुमसत असतो आत,सृजनाचा जाळ"
                                  (पृ.५७)
कवीच्या मनात नेहमी हा सृजनाचा जाळ सारखा दुमसत असतो त्याला आपल्या सभोवतीचे वातावरण ही कारणीभूत असते पण कवीला आता कोरा कागद दिसला की एखाद्या ज्वलंत विषयावर मोकळीपणा ने लिहिता येत नाही कवीला लिहिण्यापूर्वी लिहिताना आणि लिहून झाल्यावर कामालीची अस्वस्थता जाणवत राहतील व्यवस्थेच्या विरोधात लिहिली तर त्याचे काय परिणाम होतील या विचाराने कवी व्यक्त होत नाहीत त्यामुळे एखाद्या खऱ्या गोष्टीबद्दल ही काही लिहावं की नाही बोलावं की नाही ही अस्वस्थता कवीच्या मनात असते लिहून झाल्यावर ही कविता मनात हीच अस्वस्थता असते. 
खरंतर कवीने परिणामांचा विचार न करता खरं ते मांडण्यासाठी कायम अस्वस्थ राहिला पाहिजे पण असे होताना हल्ली दिसत नाही जो तो स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 
कवी साहित्य खूप विविध प्रकारचे वाचन करत असतो लिहीत असतो वेगवेगळे तत्त्वज्ञान सांगत असतो त्याला खरं खोटं न्याय अन्याय हे सगळं समजत असते पण वाचनाने तयार झालेला मन मातीच्या ढेकळावर पावसाचा थेंब पडल्यावर जशी मातीचा ढेकूण विरघळतो आणि त्याच पद्धतीने संयमी विचारी असणाऱ्या कवीच्या मनाचाही बांध फुटतो त्याबद्दल ते म्हणतात. 
"एखाद्या मातीच्या ढेकळाणं
जोरकस पावसात जावं 
वावरात संपूर्ण विरघळून तसं 
फुटत वाहवत वाहवत जातं 
माझ्यातल्या बुद्धाचं मौन" (पृ.१२१)
   माणसाला खरी श्रीमंती भौतिक वस्तू देखावा या गोष्टीत वाटते पण खरी श्रीमंती हे निसर्ग झाडाविली घरातली चांगली पुस्तकं यामध्ये आहे हे सांगताना कवी विवेक ओगर मुरली म्हणतात. 
" आता तुम्ही सांगा 
घराच्या संदर्भाने आलेली 
झाडां वेलीची नजाकत आणि 
भारी म्हणावी अशी पुस्तकं
या दोन गोष्टी जगण्याला 
चिकार आनंद देत असतील तर 
आमचे हे घर 
श्रीमंतच म्हणायचे की नाही"
                   (पृ.७०)
आजच्या माणसांना झाडे झुडप लावावे वाटत नाहीत शहरीकरणात घर बांधल्यानंतर अंगणासाठी मोकळी जागाच उपलब्ध होत नाही तर माणूस झाडझोडतो कुठे लावणार म्हणून भिंतीवर झाडाझुडपांच्या स्टाईल्स लावून आजचा माणूस समाधान मानत आहे त्याला निसर्ग पर्यावरण याचे काही देणे घेणे नाही जगण्यातली खरीसमंती खरंतर निसर्गात आहे पण आजचा माणूस वरचेवर निसर्गापासून दूर जात आहे. 
कविता काय असते कशी असते कशी आहे कोणता लेखनाचा कविता लेखनाचा आनंद हे आणि कवितेच्या संदर्भाने भांगीतली तुळस (पृ.६१,६२), याच अर्थाने (पृ.७१), वास्तव (पृ.७३), कविता लिहून झाल्यावर (पृ.७५), लेकी (पृ.८५) या कविता आहेत.कवी वाचनालाच आपला धर्म मानतात.
लिहिणाऱ्या प्रत्येक कवीला आपल्या साहित्याला पुरस्कार मिळावा ते कुठल्यातरी अभ्यासक्रमात लागावे समीक्षकांनी त्यावर लिहावे पुलावे चर्चा करावी असे वाटत असते त्यासाठी कोण काय काय करतात ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो कवी विवेक ओगर मोघले मात्र ह्या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून कविता लेखन करून बाजूला होतात खरंतर प्रत्येक कवीने आपली कविता लिहून मोकळे व्हायला पाहिजे आणि आपल्या साहित्याकडे तटस्थपणे राहून त्या साहित्याच काय होत आहे ते पाहिले पाहिजे याबद्दल ते म्हणतात 
" त्यापुढे काय त्यापुढे काय होतं,तर 
मी आणि माझी कविता
 छान स्थितप्रज्ञ होऊन 
बसतो सेम 
ध्यानस्थ बुद्धासारखा" (पृ.७६)

अशाप्रकारे कवी विवेक उगलमुगले यांची कविता स्वतःच्या कवितेकडे तटस्थपणे पाहायला शिकवणारी कविता आहे.
 या कविता मनातल्या मनात वाचायच्या असल्या तरी त्या वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.

 
 कवितासंग्रह - मनातल्या मनात वाचायच्या कविता 
कवी - विवेक उगलमुगले 

प्रकाशक - सुभाषित प्रकाशन, नाशिक 

मूल्य -१५० 

पृष्ठ -१५२

             शरद ठाकर 
         सेलू जि परभणी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा